आजच्या या भारत देशात काय घडतंय काही हि कडत नाही आहे . एकीकडे भारतात चालू असलेली राजनैतिक घडामोडी व इथली सामाजिक परिस्तिथी . आजच्या तारखेला भारताचे चित्र काही विचित्र दिसून राहले आहे. या विचित्र चित्राला रंगवण्यात आपल्या सारख्या सामान्य लोकांचा खूप मोठा हाथ भार आहे .कुठ "सैराट" दिसतंय तर कुठ त्याचे उलट . आज सैराट नि समाजासमोर एक वेगळे च चित्र प्रस्तुत केले आहे . ज्या पद्धततिने माननीय नागराज मंजुळे यांनी आपले सामाजिक विचार समाजासमोर आणले आहे ते या आजच्या युवा पिढी ला अतिशय हर्ष देणारे विचार ठरले . नागराज साहेबांनी या समाजाची खरी वस्तुस्तिथी या चित्रपटाच्या माध्यामातून फार सुंदर पद्दतीतीने दाखवलेली आहे . आज या भारत समाजात जाती-भेद चा विषय खूप गंभीर आहे . समाजाची प्रगती अश्या काही गोष्टींमुळे थांबलेली आहे . शाळेत कितीही सामाजिक ज्ञान वाटप होत असेल पण त्याचा उपयोग फार कमी जागी दिसून येतोय . प्रेम भावने सारख्या सुंदर मुखावर काळा कपडा झाकून काय भेटणार या समाजाला . आजची पिढी व उद्या येणारी पिढी या सर्व गोष्टींना सहन करू सकणार नाय असे मला वाटत . काळ बदलतोय आणि आपल्या सामन्या समाजाला देखील स्वतःमध्ये बदलाव घडवणे फार गरजेचं आहे . बदलाव हि काळाची गरज आहे . याला जर तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तर ये संपूर्ण जग तुमच्या विरोदात उभे होतील . खऱ्या अर्थाने आज या भारत देशाला वेगळ्या विचारांची आवशकता आहे तो या देशाच्या सामाजिक परिस्थिती ला सुधारू सकेल आणि या युवा पिढी च्या जगण्या ला एक मोठी भरारी देऊ सकेल. येणाऱ्या काळात सैराट घडता काम नाय .



So true Sagar dada... Everyone needs to take stand for equality and integrity.
ReplyDeleteYes
Delete